बीड : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तथा आ . संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले . रेखा क्षीरसागर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते . त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे . रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांना बुधवारी सायंकाळी अचानक हृदयविकाराचा झटका आला . त्यांना तात्काळ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे . रेखा ताई क्षीरसागर अनेकवर्ष राजुरी गावच्या सरपंच होत्या तसेच त्या बीड जिल्हा परिषदेच्या सदस्य देखील होत्या . त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे . त्यांच्या पश्चात पती रवींद्र क्षीरसागर यांच्यासह आ . संदीप क्षीरसागर , हेमंत आणि अर्जुन क्षीरसागर ही मुले , सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे क्षीरसागर परिवाराच्या दुःखात लोकमित्र परिवार सामील आहे
आ.संदीप क्षीरसागर यांना मातृशोक ; रेखाताई क्षीरसागर यांचे निधन.!
RELATED ARTICLES